Big9News
राज्य शासनाच्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. दिनांक १ जानेवारी, २०२३ ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत पाठविता येणार होत्या. तथापि, सदर पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके सादर करण्याच्या कालावधीस एक महिना अधिकची मुदतवाढ देण्यात आली आहे. सदर पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम मुदत दिनांक २ मार्च, २०२३ असेल.
शासनस्तरावरून गतवर्षीच्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेच्या नियमावलीतील नियम क्र. २४ मध्ये बदल करण्यात आला असून, सदर नियमात, 39महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरील शासन नियुक्त सदस्य वगळता इतरांना उक्त पुरस्कारासाठी पुस्तके सादर करता येतील. अशी सुधारणा करण्यात आली आहे.
या सुधारित नियमाची अंमलबजावणी सन २०२२ च्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय
पुरस्कार स्पर्धेपासून करण्यात येत आहे. सदर योजनेची सन २०२२ च्या पुरस्कार स्पर्धेसाठीची सुधारित नियमावली व प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली व पणजी, गोवा येथे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर व कार्यालयात उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील ज्या लेखकांना, प्रकाशकांना या योजनेत भाग घ्यावयाचा असेल त्यांनी प्रत्येक प्रवेशिका प्रपत्रासोबत, आपल्या पुस्तकांच्या दोन प्रती विहीत नमुन्यातील अर्जासह जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सादर कराव्यात असे, आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पावर यांनी केले आहे.